२६/११ च्या निमित्ताने....................................
तिरंगा ज्याना स्वार्थाहुनहि सदैव उंच वाटला त्या तिथेच नेमका आज हिरवा-भगवा पेटला जेथे जन्मून गांधिजीनी जगतास शिकवीली आहिंसा त्या तिथेच नेमकी आज ढळढळीत जळते हिंसा सीमेवरती जवान होते परतविण्यास हल्ला त्या तिथेच नेमका आज आतिरेक्यांचा डल्ला दहशतवाद म्हणजे हिंसेच्या किंवा दहशतीच्या मार्गाने आपले इप्सित साध्य करुन घेणे.तस बघितल तर गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचे वारे सर्वच क्षेत्रात वाहू लागले आहेत, त्याचा कमी- अधिक प्रभाव राजकीय व सामाजिक परिस्थितीवर पडलेला दिसून येत आहे.मात्र त्याचा परिणाम दहशतवादी करवायांवर होइल असे वाटले नव्हते. दोन दशका पूर्वी काही विशिष्ठ कारणामुळे निर्माण झालेला दहशतवाद आता सर्वच क्षेत्रात पसरू लागला आहे.आणि भारतासारख्या देशात तर तो एक गंभीर प्रश्न बनला आहे.२६ - ११ - २००८ ला मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्षे पूर्ण झाली. तरीही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. इतिहास बघितला तर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करुन हा दहशतवाद जगासमोर आला पण इंदिरा गांधीनि शीख मत बँकेचा विचार न करता सुवर्ण मंदिरावर करवाई करुन अतिरेक्याना चोख प्रतिउत्तर दिले त्या करव